श्री मनाचे श्लोक ११ ते २०

।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।



जनी सर्व सुखी असा कोण ।

आहे विचारे मना तुंचि शोधूनी पाहे ।।

मना त्वांची रे पूर्व संचित केले ।

तया सारिखे भोगणे प्राप्त झाले ।।११।।



मना मानसीं दुःख आणूं नको रे ।

मना सर्वथा शोक चिंता नको रे ।।

विवेके देहबुद्धी सोडूनी द्यावी ।

विदेहीपणें मुक्ती भोगीत जावी ।।१२।।



मना सांग पा रावणा काय झाले ।

अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।।

म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।

बळे लागला काळ हा पाठी लागी ।।१३।।


जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला ।

परी शेवटी काळमुखी निमाला ।।

महाथोर ते मृत्यु पंथेची गेले ।

किती एक ते जन्मले आणि मेले ।।१४।।


मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।

जीता बोलती सर्वही जीव मी मी ।।

चिरंजीव हे सर्वही मानिताती ।

अकस्मात सांडूनीया सर्व जाती ।।१५।।


मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।

अकस्मात तोही पुढे जात आहे ।।

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते ।

म्हणुनी जनी मागुता जन्म घेते ।।१६।।


मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।

अकस्मात होणार होऊनी जाते ।।

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतिमंद ते खेद मानी वियोगें ।।१७।।


मना राघवेंवीण आशा नको रे ।

मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।।

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणें ।

तया वर्णिता सर्व ही श्र्लाघ्यवाणे ।।१८।।



मना सर्वथा सत्य सांडूं नको रे ।

मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।।

मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।

मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावें ।।१९।।



बहु हिंपुटी होईजे मायेपोटी ।

नको रे मना यातना तेचि मोठी ।।

निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।

अधोमुख रे दुःख त्या बाळकासीं ।।२०।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...