श्री मनाचे श्लोक २१ ते ३०


||  श्री मनाचे श्लोक २१ ते ३० ||




|| जय जय रघुविर सम
र्थ ||




मना वासना चुकवी येरझारा |

मना कामना सांडी रे द्रव्यदारा ||

मना यातना थोर हे गर्भवासी |

मना सज्जना भेटवी राघवासीं || २१ ||


मना सज्जना हीत माझे करावे ||

रघुनायका दृढ चित्ती धरावे ||

महाराज तो स्वामी वायू सुताचा |

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा || २२ ||


न बोलें मना राघवेवीण कांही |

जनी वाउगें बोलता सुख नाहीं ||

घडीने घडी काळ आयुष्य नेतो |

देहांती तुला कोण सोडूं पाहतो || २३ ||


रघुनायकाविण वायां शिणावे |

जनासारिखे व्यर्थ कां वोसंणावें ||

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे |

अहंता मनी पापीणी ते नसो दे || २४ ||


मना वीट मानू नको बोलण्याचा |

पुढे मागुता राम जोडेल कैंचा ||

सुखाची घडी लोटतां सूख आहे |

पुढे सर्व जाईल कांही न राहे || २५ ||


देहे रक्षणे कारणे यत्न केला |

परी शेवटी काळ घेऊन गेला ||

करी रे मना भक्ति या राघवाची |

पुढे अंतरी सोडी चिंता भवाची || २६ ||


भवाच्या भये काय भितोस लंडी |

धरी रे मना धीर धाकास सांडी ||

रघुनायका सारिखा स्वामी शिरी |

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी || २७ ||


दिनानाथ हा राम कोदंडधारी |

पुढे देखता काळ पोटी थरारी ||

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || २८ ||


पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |

बळे भक्तिरीपूशिरी कांबि वाजे ||

पुरी वाहिली सर्व जेने विमानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || २९ ||


समर्थाचिया सेवका वक्र पाहे |

असा सर्व भूमंडळी कोण आहे ||

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी || ३० ||


|| जय जय रघुविर समर्थ ||



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...