श्री मनाचे श्लोक १७१ ते १८०


।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।













असे सार साचार ते चोरलेसे ।

इहीं लोचनी पाहता दृश्य भासे ।।

निराभास निर्गुण तें आकळेना ।

अहंतागुणे कल्पिता हि कळेना ।।१७१।।


स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या ।

स्फुरे ब्रम्ह रे जाण माया सुविद्या ।।

मुळी कल्पना दो रूपे तेचि झाली ।

विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली ।।१७२।।


स्वरूपी उदेला अहंकार राहो ।

तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ।।

दिशा पाहता ते निशा वाढताहे ।

विवेके विचारे विवंचूनि पाहे ।।१७३।।


जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।

भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ।।

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।

दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो ।।१७४।।


विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी ।

परी लिहिता कोण त्याचे कपाळी ।।

हरू जाळितो लोक संहारकाळी ।

परी शेवटी शंकरा कोण जाळीं ।।१७५।।


जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।

असंख्यात संख्या करी कोण शक्रा ।।

जगी देव धुंडाळिता आढळेना ।

जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ।।१७६।।


तुटेना फुटेना कदा देवराणा ।

चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ।।

कळेना कळेना कदा लोचनासी ।

वसेना दिसेना जगी मीपणासी ।।१७७।।


जया मनिला देव तो पूजिताहे ।

परी देव शोधुनि कोणी न पाहे ।।

जगी पाहता देव कोट्यानुकोटी ।

जया मानली भक्ती जे तेचि मोठी ।।१७८।।


तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।

तया देवरायासी कोणी न बोले ।।

जगी थोरला देव तो चोरलासे ।

गुरुविण तो सर्वथाही न दिसे ।।१७९।।


गुरु पाहता पाहता लक्ष कोटी ।

बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी ।।

मनी कामना चेटके धातमाता ।

जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ।।१८०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...