।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
असे सार साचार ते चोरलेसे ।
इहीं लोचनी पाहता दृश्य भासे ।।
निराभास निर्गुण तें आकळेना ।
अहंतागुणे कल्पिता हि कळेना ।।१७१।।
स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रम्ह रे जाण माया सुविद्या ।।
मुळी कल्पना दो रूपे तेचि झाली ।
विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली ।।१७२।।
स्वरूपी उदेला अहंकार राहो ।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ।।
दिशा पाहता ते निशा वाढताहे ।
विवेके विचारे विवंचूनि पाहे ।।१७३।।
जया चक्षुने लक्षिता लक्षवेना ।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ।।
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।
दयादक्ष तो साक्षीने पक्ष घेतो ।।१७४।।
विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी ।
परी लिहिता कोण त्याचे कपाळी ।।
हरू जाळितो लोक संहारकाळी ।
परी शेवटी शंकरा कोण जाळीं ।।१७५।।
जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा ।।
जगी देव धुंडाळिता आढळेना ।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ।।१७६।।
तुटेना फुटेना कदा देवराणा ।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ।।
कळेना कळेना कदा लोचनासी ।
वसेना दिसेना जगी मीपणासी ।।१७७।।
जया मनिला देव तो पूजिताहे ।
परी देव शोधुनि कोणी न पाहे ।।
जगी पाहता देव कोट्यानुकोटी ।
जया मानली भक्ती जे तेचि मोठी ।।१७८।।
तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।
तया देवरायासी कोणी न बोले ।।
जगी थोरला देव तो चोरलासे ।
गुरुविण तो सर्वथाही न दिसे ।।१७९।।
गुरु पाहता पाहता लक्ष कोटी ।
बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी ।।
मनी कामना चेटके धातमाता ।
जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ।।१८०।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा