श्री मनाचे श्लोक १६१ ते १७०


।। श्री ।।
।। श्री राम समर्थ ।।
।। जय जय  रघुवीर समर्थ ।।






















अहंतागुणे गुणे सर्वही दुःख होते ।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ।।
सुखी राहता सर्वही सुख आहे ।
अहंता तुझी तूच शोधूनि पाहे ।।१६१।।


अहंतागुणे नीती सांडी विवेकी ।
अनीतीबळें श्लाघ्यता सर्व लोकी ।।
परी अंतरी सर्वही साक्ष येते ।
प्रमाणांतरे बुद्धी सांडूनि जाते ।।१६२।।


देहेबुद्धीचा निश्चयो दृढ झाला ।
देहातीत तो हित सांडीत गेला ।।
देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६३।।


मनें कल्पिता विषयो सोडवावा ।
मनें देव निर्गुण तो ओळखावा ।।
मनें कल्पिता कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६४।।


देहादिक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ।।
हरिचिंतणे मुक्तिकांता करावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६५।।


अहंकार विस्ताराला या देहाचा ।
स्रीयापुत्रमित्रादिके मोह ज्यांचा ।।
बळें भ्रांती हे जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६६।।


बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।
म्हणे दास संदेह तो वीसरावा ।।
घडीने घडी सार्थकाची  करावी ।
सदा संगती सज्जनाची धारावी ।।१६७।।


करी वृत्ती जो संत तो संत जाणा ।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ।।
उपाधी देहेबुद्धि ते वाढविते ।
परी सज्जना केवी बाधू शके ते ।।१६८।।



नसे अंत आनंत संता पुसावा ।
अहंकार विस्तार हा नीरसावा ।।
गुणेवीण निर्गुण तो आठवावा ।
देहेबुद्धीचा आठवु नाठवावा ।।१६९।।


देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी ।
विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी ।।
तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे ।
म्हणोनि सदा तेचि शोधीत जावे ।।१७०।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...