श्री मनाचे श्लोक ६१ ते ७०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।




।। श्री मनाचे श्लोक ६१ ते ७० ।।




उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे 
तया अंतरी सर्वदा तेचि राहे 
जनी सज्जनी वाद हा वाढवावा 
पुढे मागुता शोक जीवी धरावा ६१

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला 
बळे अंतरी शोक संताप ठेला 
सुखानंद आनंद भेदे बुडाला 
मनी निश्चयो सर्व खेदे उडाला ६२

घरी कामधेनू पुढे ताक मागे 
हरीबोध सांडूनि वेवाद लागे 
करी सार चिंतामणी काचखंडे 
तया मागता देत आहे उदंडे ६३

अती मूढ त्या दृढ बुध्दी असेना 
अती काम त्या राम चित्ती वसेना 
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा 
अती विषयी सर्वदा दैन्यवाणा ६४

नको दैन्यवाणे जिणे भक्तीऊणे 
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे 
धरी रे मना आदरे प्रीति रामी 
नको वासना हेमधामी विरामी ६५

नव्हे सार संसार हा घोर आहे 
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे 
जनी विष खाता पुढे सूख कैचे 
करी रे मना ध्यान या राघवाचे ६६

घनश्याम हा राम लावन्यरूपी 
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी 
करी संकटी सेवकाचा कुढावा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा  ६७ 


बळे आगळा राम कोदंडधारी 
महा काळ विक्राळ तोही थरारी 
पुढे मानवा किंकरा कोण केवा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ६८

सुखानंदकारी निवारी भयाते 
जनी भक्तीभावे भजावे तयाते 
विवेकी त्यजावा अनाचार हेवा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ६९

सदा रामनामे वदा पूर्णकामे 
कदा बधिजेना पदा नित्यनेमे 
मदालस्य  हा सर्व सोडुनि द्यावा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ७०


।। जय जय रघुविर समर्थ ।।

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...