श्री मनाचे श्लोक ७१ ते ८०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।














।। श्री मनाचे श्लोक ७१ ते ८० ।। 


जयाचेनि नामे महा दोष जाती ।

जयाचेनि नामे गती पाविजेती ।।

जयाचेनि नामे घडे पुण्यठेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७१ ।।

 


न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ काही ।

मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ।।

महा घोर संसार शत्रु जिणावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७२ ।।


 

देहेदंडणेचे महादुःख आहे

महादुःख ते नाम घेता न राहे ।।

सदाशीव चींतीतसे देवदेवा 

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७३ ।।

 

 

बहुंतापरी संकटे साधनांची

व्रते दान उद्यापने ती धनाची ।।

दिनाचा दयाळू मनी आठवावा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७४ ।।

 

 

समस्तामध्ये सार साचार आहे

कळेना तरी सर्व शोधूनि पाहे ।।

जीवा संशयो वाउगा तो त्यजवा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७५ ।।

 

 

नव्हे कर्म ना धर्म ना योग काहीं

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।।

म्हणे दास विश्वास नामी धरावा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७६ ।।

 

 

करी काम निष्काम या राघवाचे

करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।।

करी छंद निर्व्दंद हे गूण गातां

हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।। ७७ ।।

 

 

अहो ज्या नरा रामविश्वास नाही

तया पामरा बाधिजे सर्व काही ।।

महाराज तो स्वामी कैवल्यदाता

वृथा वाहणे देहसंसारचिंता ।। ७८ ।।

 

 

मना पावना भावना राघवाची ।

धरी अंतरी सोडी चिंता भवाची ।।

भवाची जिवा मानवा भुली ठेवा ।

नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ।। ७९ ।।

 


धरा श्रीवरा त्या हरा अंतराते l

तरा दुस्तरा त्या परा सागराते ।।

सरा विसरा त्या भरा दुर्भराते

करा नीकरा त्या खरा मत्सराते ll ८० ।।




।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...