।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्री मनाचे श्लोक ८१ ते ९० ।।
मना
मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती
आदरे हा निजध्यास राहो ।।
समस्तामधे
नाम हे सार आहे ।
दुजी
तूळणा तूळिताही न साहे ।। ८१ ।।
बहू
नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या
नरा पामरा हे कळेना ।।
विषा
औषध घेतले पार्वतीशे ।
जिवा
मानवा किंकरा कोण पूसे ।। ८२ ।।
जेणे
जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी
अती आदरें गूण गातो ।।
बहू
ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।
परी
अंतरी नामविश्वास तेथे ।। ८३ ।।
विठोने
शिरी वाहिला देवराणा ।
तया
अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।।
निवाला
स्वये तापसी चंद्रमौळी ।
जिवा
सोडवी राम हा अंतकाळी ।। ८४ ।।
भजा
राम विश्राम योगेश्वरांचा ।
जपू
नेमिला नेम गौरीहराचा ।।
स्वयें
निववी तापसी चंद्रमौळी ।
तुम्हा
सोडवी राम हा अंतकाळी ।। ८५ ।।
मूखी
राम विश्राम तेथेचि आहे ।
सदानंद
आनंद सेवूनि राहे ।।
तयावीण
तो सीण संदेहकारी ।
निजधाम
हे नाम शोकापहारी ।। ८६ ।।
मुखी
राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे
इष्ट धारिष्ट्य त्याचे चुकेना ।।
हरिभक्त
तो शक्त कामास मारी ।
जगी
धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।। ८७ ।।
बहू
चांगले नाम या राघवाचे ।
अती
साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।।
करी
मूळ निर्मुळ घेता भवाचे ।
जिवा
मानवा हेचि कैवल्य साचे ।। ८८ ।।
जनी
भोजनी नाम वाचे वदावे ।
अती
आदरे गद्य घोषे म्हणावे ।।
हरीचिंतने
अन्न सेवीत जावे ।
तरी
श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।। ८९ ।।
न
ये राम वाणी तया थोर हानी ।
जनी
व्यर्थ प्राणी तया नाम कानी ।।
हरिनाम
हे वेदशास्त्री पुराणी ।
बहू
आगळे बोलिली व्यासवाणी ।। ९० ।।
।। जय जय रघुविर समर्थ ।।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा