श्री मनाचे श्लोक ११० ते १२०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।





।। श्री मनाचे श्लोक १११ ते १२० ।। 


हिताकारणे बोलणे सत्य आहे |
हिताकारणे सर्व शोधूनी पाहे ||
हिताकारणे बंड पाखाड वारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी || १११ ||


जनी सांगता ऐकता जन्म गेला |
परी वाद वेवाद तैसाचि ठेला ||
उठे संशयो वाद हा दंभधारी |
तुटे वाद संवाद तो हितकारी || ११२ ||


जनी हित पंडित सांडीत गेले
अहंतागुणे ब्रम्ह राक्षस झाले
तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे
मना सर्व जाणिव सांडुनी राहे || ११३ ||


फुकाचे मुखी बोलता काय वेचे |
दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ||
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे |
विचारे तुझा तुची शोधूनी पाहे ||११४ ||


तुटे वाद संवाद तेथे करावा |
विवेके अहंभाव हा पालटावा ||
जनीं बोलण्यासारिखे आचरावे |
क्रियापालटे भक्तीपंथेची जावे  || ११५ ||


बहु शापिता कष्ठला अंबरुषी |
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ||
दिला क्षीरसिंधु तया उपमानी|
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||११६ ||


धरु लेकरू बापुडे दैन्यवाने |
कृपा भाकीता दिधली भेट जेणे ||
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११७ ||


गजेंद्रु महासंकटी वाटपाहे |
तयाकारणे श्रीहरी धावताहे ||
उडी घातली जाहला जिवदानी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११८ ||


अजामेळ पापी तया अंत आला |
कृपाळुपणे तो जनी मुक्त केला ||
अनाथासी आधार हा चक्रपाणी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || ११९ ||


विधीकारणे जाहला मत्सवेगी |
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी ||
जना रक्षणाकारणे हीन योनी |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी || १२० ||



।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...