श्री मनाचे श्लोक १३१ ते १४०


।। श्री ।।

।। श्री राम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।













भजाया जनीं पाहता राम ऐकू ।

करी बाण एकू मुखी शब्द एकू ।। 

क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।

धरा जानकीनायकाचा विवेकु ।।१३१।।


विचारूनि बोले विवंनचुनी  चाले ।

तयाचेनि संतप्त तेही निवाले ।।

बरें शोधल्याविण बोलो नको हो ।

जणी चालणे शुद्ध नेमस्त राहो ।।१३२।।


हरीभक्त विरक्त विज्ञानराशी ।

जेणें मानसी स्थापिले निश्चयासी ।।

तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे ।

तया भाषणे नष्ट संदेह मोडे ।।१३३।।


नसे गर्व अंगी सदा वितरागी ।

क्षमा शांती भोगी दयादक्ष योगी ।।

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।

इही लाक्षणी जाणिजे योगिराणा ।।१३४।।


 धरी रे मना संगती सज्जनाची ।

जेणें वृत्ती  पालटे दुर्जनाची ।।

बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे ।

महाक्रूर तो काळ विक्राळ  भंगे ।।१३५।।


भये व्यापिले  सर्व ब्रह्मांड आहे ।

भयातीत तें  संत आनंत पाहे ।।

जया पाहता द्वैत काहीं दिसेना ।

भयो मानसीं  सर्वथाही असेना ।।१३६।।


जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।

परी जिव अज्ञान तैसेचि ठेले ।।

देहेबुद्धिचें कर्म खोंटें टळेना ।

जुने ठेवणे मी पणे  आकळेना ।।१३७।।


भ्रमे नाढळे वित्त तें  गुप्त जाले ।

जीव जन्म दारिद्र ठाकूनि आले ।।

देहेबुद्धीचा निश्चयो ज्या ठाळेना ।

जुने ठेवणे मी पणे आकळेना ।।१३८।।


पुढे पाहता सर्व हि कोंदलेसे ।

अभाग्यासी हे दृश्यं पाषाण भासे ।।

अभावे कदा पुण्य गांठी पडेना ।

जुने ठेवणे मी पणे आकळेना ।।१३९।।


जायचे तया चुकले प्राप्त नाहीं ।

गुणें गोविले जाहले दुःख देहीं ।।

गुणावेगळी वृत्ती तेही वळेना ।

जुने ठेवणे मी पणे आकळेना ।।१४०।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...